आनंदाची बातमी: सातारा /एमएनसी न्यूज नेटवर्क- राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या मोठं धरण म्हणून कोयना धरण प्रसिद्ध आहेत त्यामुळे परिसरातील लाखो हेक्टर जमिनीला मुबलक पाणी मिळते आणि वीज निर्मिती ही होते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने 50 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 51.93 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे, तर धरणात प्रतिसेकंद सुमारे 59 हजार 851 क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे.
गत उलटलेल्या 24 तासांत सुमारें 4 टीएमसीने पाणीसाट्यात वाढ नोंदली गेली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. सध्या प्रतिसेकंद 60 हजार क्युसेक इतकी आवक सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाणीसाठ्यात तब्बल 4 टीएमसीने वाढ झाली आहे. तसेच पाण्याची आवक 10 हजार क्युसेकने वाढली आहे. गेल्या चोवीस तासात नवजा येथे 201 मिलीमीटर, महाबळेश्वरमध्ये 185 आणि कोयनानगर येथे 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरणात 18 जून रोजी केवळ 10.66 टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यातील 5.66 इतकाच उपयुक्त पाणीसाठा होता. धरणातील पाण्याने तळ गाठला होता. धरणातील जुने अवशेष उघडे पडले होते. सगळीकडे गाळ पाहायला मिळत होता. यापुर्वी 26 जून 2019 रोजी पाणीसाठ्याने तळ गाठला होता. त्यावेळी धरणात 10.75 टीएमसी एवढा निच्चांकी पाणीसाठा शिल्लक होता.

