भारताची चांद्रयान मोहीम 3 उपग्रहांनी पाठविला चंद्राचा पहिला फोटो.

इस्त्रोने प्रसिद्ध केलेले छायाचित्र

चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल,चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे.

श्रीहरीकोट्टा : भारताचे चंद्रयान-३ शनिवारी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी २२ दिवस प्रवास करून  चंद्राच्या कक्षेत पोहोचले. कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी चंद्राची पहिली प्रतिमा पृथ्वीवर पाठवली.याचा व्हीडीओ इस्रोने ट्विटर हँण्डलवर शेअर केला आहे. व्हीडीओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे.

पृथ्वी आणि चंद्राची गोष्ट जवळजवळ एकाच वेळी सुरू होते. ही गोष्ट सुमारे ४५० कोटी वर्षे जुनी आहे. तेव्हापासून आजतागायत अंतराळातून येणारे दगड आणि उल्का या दोघांवर सतत पडत आहेत. त्यांच्या पडण्यामुळे खड्डे तयार होतात. त्यांना ‘इम्पॅक्ट क्रेटर’ असेही म्हणतात. पृथ्वीवर आतापर्यंत असे १८० प्रभाव विवर शोधण्यात आले आहेत. चंद्रावर सुमारे १४ लाख खड्डे आहेत. ९१३७ पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. मात्र आणखी हजारो खड्डे मानवाला बघताही आलेले नाहीत. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे.

नासाने १७ मार्च २०१३ रोजी चंद्रावरील सर्वात मोठे विवर पाहिले. जेव्हा ४० किलो वजनाचा दगड ताशी ९० हजार किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला. या धडकेने २९० किलोमीटरचा खड्डा निर्माण झाला. आपण तो जमिनीवरून देखील पाहू शकतो. दुर्बिणीतून पाहिल्यास अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. चंद्रावर पाणी नाही. वातावरणही नाही. पृथ्वीसारख्या टेक्टोनिक प्लेट्सही नाहीत. त्यामुळे तिथे माती कापली जात नाही. धूप होत नाही. त्यामुळे हे खड्डे भरले जात नाही. दरम्यान, चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-३चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.