बीड/शिरूर:शुक्रवारी दि.25 सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील मानूर जवळ झालेल्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जख्मी झाल्याची घटना घडली.तागडगाव येथील नाईकनवरे कुटुंबीय मोहटादेवीच्या दर्शनासाठी जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडीने दोन ते तीन पलट्या खाल्ल्या.गाडीचालक गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे (40) आणि दिव्या अजिनाथ मडके (8) महिने यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यु झाला.
लताबाई अंबादास नाईकनवरे,उषाबाई गोकुळ नाईकनवरे (35) दादा गोकुळ नाईकनवरे (14) प्रगती गोकुळ नाईकनवरे (15) कोमल अजिनाथ मडके (24) आणि बाळू मच्छिंद्र सटले (18)हे सहा जण जख्मी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.एम.एच.44 जी 1655 क्रमांकाच्या व्हिस्टाचा अपघात एवढा भीषण होता की,गाडीने दोन-तीन पलट्या घेत रस्ता सोडला.चालक गोकुळ नाईकनवरे हे जागीच ठार झाले तर दिव्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब शिरसाट हे करत आहेत.

