परळी तालुक्यात जनावरांना पाण्याचा प्रश्न गंभीर

जनावरांचा चारा /पाणी/असह्य उन्हाळा 
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- प्रतिवर्षापेक्षाही नेहमीच अधिकचा वाटणारा उन्हाळा यावेळेसही अतिशय तीव्र स्वरूपाचा जाणवत आहे. तालुक्यातील लघु आणि मध्यम तलाव कोरडे पडले आहेत. दिवसा आणि रात्री प्रचंड उष्मामुळे मुक्या जनावरांचे हाल होत आहेत. डोंगर माथे आत्ताशा पडलेल्या अवकाळी पावसाने थोडीशी हिरवळ त्याच्यावर दिसून येत आहे. मात्र जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न फारसा परळी तालुक्यात उद्भवलेला नाही परिसरात चाऱ्याची टंचाई नाही.
तालुक्यात पशुधन्याचा चाऱ्याचा प्रश्न तितका गंभीर नाहीये अस मत तालुक्यातील शिरसाळा, पिपरी अधिभागातील शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केलं. परळी तालुका हा पाण्यावर वसलेला आहे अशी एक आख्यायिका पूर्वापार चालत आली आहे, याला मात्र सध्या छेद बसत असून एकूणच भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याचे चिन्ह सर्वत्र दिसून येत आहेत. शहरातील आणि तालुक्यातील अनेक आड, विहीर, बोर, एप्रिलच्या मध्यालाच कोरडे पडले आहेत. तर तालुक्यातील लघु ,मध्यम आणि साठवण तलाव मार्च मध्येच कोरडे पडले आहेत. येणारा मे महिना अधिक तीव्रतेचा असण्याची चिन्ह हवामान खात्याने व्यक्त केली आहेत.
………………………………………………
परळी तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अद्याप उद्भवलेला नाही. ग्रामीण भागातील काही गावात, वाडी वस्ती , तांड्यावर पाण्याच्या टँकरची मागणी झाली की त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे.  निवडणूक प्रक्रिये चा  कामावर कुठलाही परिणाम परळी तहसील द्वारे येऊ दिला जात नाही.
बाबुराव रुपनर 
नायब तहसीलदार, परळी वैजनाथ.
……………………………………………………
पिंपरी बु परिसरात पशुधन यासाठी चार्याचा प्रश्न तेवढा गंभीर नाही, परंतु जनावरांना पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थानी टॅंकरची मागणी ग्रामसेवकांना केली आहे. परंतू प्रशासनाकडून आणखी सकारात्मक निर्णय नाही घेतला .त्या मुळे पशुधन जगविण्यासाठी शेतकरी मोठी कसरत करत आहेत.
लक्ष्मण डिकले,
शेतकरी, पिपरी (बु)