राज्य परिवहनचे कर्मचारी संप मिटला

मूळ  पगारात ६५०० ची वाढ

मात्र राज्य परिवहनचे कर्मचारी संपाने परळी आगाराचे सुमारे १०,३९,५४० उत्पन्न बुडाले
दर्शनाला आलेल्या भाविकांचे बेहाल

परळी- वैद्यनाथ  / : एस टी  कामगारांचा संप मिटला असून मुळ पगारात रु. ६५००/- एवढी वाढ दिली आहे . मात्र या संपा मुळे परळी आगारातून  ४ तारखेस  सायंकाळी पाच वाजेपर्यंत 111 फेऱ्या रद्द झाल्या. परळी आगारातील सुमारे 325 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. यात प्रशासकीय आणि चालक- वाहक यासह तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

परळी स्थानक हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्यामुळे रेल्वेने येथे येणाऱ्या नागरिकांना दर्शनानंतर बसद्वारे आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आज कुठलीही व्यवस्था नसल्याकारणाने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. अनेकांना अत्यावश्यक काम असल्यामुळे मोटरसायकलचा आधार घेऊन आपलं काम ऊरकावे लागले तर स्थानक परिसरातून तीन चाकी, ऑटो रिक्षा मालवाहू गाड्या, स्थानकासमोरून जाणाऱ्या ट्रक खाजगी बसेस यांनी दाम दुपटीचा दर आकारत आपलं उखळ पांढरं करून घेतलं.

◾परळी आगाराच्या दृष्टीने आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत 111 फेऱ्या रद्द झाल्या, अंतराचा विचार केला तर सुमारे 21 हजार 318 किलोमीटर अंतराचा कामकाजाचा ठप्प झालं. तर आर्थिक नुकसान सुमारे १० लाख 39 हजार 540 रुपये झाले आहे. एकूणच वाहतूक कोलमडल्यामुळे अनेकांची मोठी तारांबळ झाली. रिक्षा आणि चार चाकी खाजगी वाहनांनी दाम दुप्पट पैसे आकारून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवलं.