प्रभू वैद्यनाथ व कालत्री देवी ची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न.

विजयादशमी -दसरा
अंबाबाईचा उदो उदो जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

बीड/परळी वैजनाथ /प्रतिनिधी – प्रभुवैद्यनाथाच्या मंदिरापासून पालखी नियमित आणि पारंपारिक मार्गावरून सावळाराम मंदिर, गणेश पार, साठे नगर,कालरात्री देवी मंदिर परिसरात आली. पालखीचे येथे आगमन होताच काळ रात्री मंदिरात परिसरात आतिषबाजी करण्यात आली. यावेळी आई राजा उदो उदो जयघोष दम दुमला.

दरम्यान पालखी मार्गावर अनेक ठिकाणी प्रभू वैद्यनाथाची आरती करण्यात आली आणि पुष्पवृष्टीही करण्यात आली.  जागोजागी सडा रांगोळी ने रस्ते सुशोभित करण्यात आले होते रस्त्याच्या दुतर्फा महिला आणि मुले मुली उभे होती.
प्रभू वैद्यनाथाच्या पालखी आगमनानंतर काल रात्री मंदिरापासून प्रभू श्री वैद्यनाथ यांच्या पालखी सोबतच काल रात्रीची पालखी बटूभैरव मंदिरात दाखल झाली. आणि रात्री नऊच्या सुमारास दोन्ही पालख्या वैद्यनाथ मंदिरात आल्या. पालखी आगमनाच्या वेळी वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावर भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी थांबून होते. पालखीसोबत वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक बाबा देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, राजेश देशमुख, जाजू यांच्या समवेत इतर अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

शुभेच्छाचे आदान-प्रदान.
काळरात्री देवी मंदिर परिसरात विविध पक्ष, संघटनांची शुभेच्छा देवानघेवाणीसाठी मंडप उभी करण्यात आली होती. विविध संघटना, पक्ष, कार्यकर्त्यांनी नागरिकांना आपट्याची पाने देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

हिंगलाज माताची पालखी सोहळा
शहरातील भावसार समाजाच्या वतीने विजयादशमी निमित्त समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हिंगलाज माता यांची मोठी पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती. पालखी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आणि समाज बांधव युवक युवती मोठ्या संख्येने महिला सहभागी झाले.

अंबाजोगाई मार्गावरील पार्वती नगर येथून ही पालखी शिवाजी महाराज चौक,एकमीनार चौक, राणीलक्ष्मी बाई टॉवर, गणेश पार मार्गे आंबेवेशेतील सरस्वती नदी पुलावर थांबते तेथे प्रभुवैद्यनाथाच्या पालखीचा आणि या पालखीचा मिलाप होऊन हिंगलाज मातांची पालखी सोहळा प्रभू वैद्यनाथ मंदिरात येते. येथे आरती संपन्न होऊन माणिक नगर मार्गे  पालखी पुनश्च हिंगलाज माता मंदिरा कडे रवाना होते. नंतर हिंगलाज माता मंदिरात पालखीचा समारोप झाला. यावेळी समाजातील सर्वच आबाल वृद्ध पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी श्रीराम गुंडाळे ,संजय फटाले, राजेश फटाले, भारत बोंडगे सर, विलास कुसुमकर, सुमित मेहत्रजकर अनिल सुतरावे गोपाळ कंकाळ, वळसे आणि प्रभाकर हजारे उपस्थित होते.