संग्रहित छायाचित्र
🔺 हेल्मेट वापरा – अन्यथा वाहनचालकांवर आणि सहप्रवाशांवर दंड दंडात्मक कारवाई 🔺 अपघाती मृत्यू टाळण्यासाठी सक्ती
मुंबई : वृत्तसंस्था – शहरी भागात तसेच ग्रामीण भागातील अनेक दुचकीचे अपघातात हेल्मेट नसल्या कारणाने अनेक जीव जातात . सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरण्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य पोलिस विभागाने जारी केले आहेत.रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि जखमींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दुचाकी चालवणारे वाहनचालक आणि सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे .
पोलिस आयुक्तालये आणि जिल्ह्यांत अंमलबजावणी या आदेशाची अंमलबजावणी औरंगाबाद (ग्रामीण), बीड, परभणी, राज्यातील प्रमुख पोलिस आयुक्तालये आणि जिल्ह्यांमध्ये होणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, सोलापूर अमरावती, पिंपरी-चिंचवड समाविष्ट आहे. पोलिस अधीक्षक कार्यक्षेत्रामध्ये अकोला, अमरावती (ग्रामीण), बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर (ग्रामीण), वर्धा, धुळे, नंदुरबार, नाशिक (ग्रामीण), जळगाव, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश असेल.
हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर आणि सहप्रवाशांवर दंड आणि दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हेल्मेटचा वापर केल्यास अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि जखमींच्या प्रमाणात मोठी घट होईल, असा विश्वास पोलिस खात्याने व्यक्त केला आहे.
