९ रेल्वे गाड्या रद्द, १० गाड्यांचे मार्ग बदलले, प्रवाशांना मनस्ताप

🔷 संग्रहित छायाचित्र

🔻रेल्वे रद्द 🔻मार्ग बदलले

जळगांव- भुसावळ : मध्य  रेल्वे प्रशासनाने अचानक रद्द केलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. रेल्वे प्रशासनाने महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागामधून धावणााऱ्या ९ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे, तर दहा गाड्यांचे मार्गात बदल केले आहेत.

रेल्वे प्रशासनाने अचानक रद्द केलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहे. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये

◾छपरा – सुरत एक्स्प्रेस २६ फेब्रुवारीला सुटणार नाही, ◾ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस २६ रोजी रद्द केली आहे. ◾एकता नगर- वाराणसी एक्स्प्रेस २५ रोजी, ◾पुणे -दानापुर एक्स्प्रेस २५ आणि २६ रोजी, ◾ लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस २५ व २६ रोजी रद्द,◾ हावडा- मुंबई मेल २५ व २६ रोजी रद्द, ◾पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २६ व २७ रोजी रद्द आहे.◾भागलपूर-सुरत एक्स्प्रेस २७ रोजी रद्द,◾ पुणे- मुझफ्फरपूर विशेष गाडी २६ रोजी रद्द, ◾उधना-बनारस एक्स्प्रेस २५ रोजी रद्द केली आहे.

दरम्यान मार्गात बदल केलेल्या गाड्यांच्या संदर्भात माहिती मिळू शकली नाही. प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित स्थानकावर चौकशी करावी.