🔺वातावरण 🔺हवामान 🔶 कोकणात उन्हाचा यलो अलर्ट 🔶 फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानात मोठी वाढ
पुणे : एकूणच राज्यात तापमान वृद्धी होण्यास सुरुवात झाली असून मराठवाडा, विदर्भ, आणि कोकण या भागात तापमानात वाढ होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने कोकणातील रत्नागिरी परिसरात काल उच्चांकि तापमान नोंदले गेले. कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. रत्नागिरी येथे सोमवारी सुमारे ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद जालना आदी जिल्हाभागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच चमकदार होऊन दिसून येत होते. हवामान कोरडे असल्यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहे.
वेधशाळेने वरतीविलेल्या अंदाजाप्रमाणे एकूणच राज्यातील या शहराचे तापमान पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या भागांचे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे,

