🔶 बहुजन साहित्य संमेलन विशेष वृत्त
बुलढाणा-सिंदखेडरा -एम एन सी न्यूज नेटवर्क- मराठीच नव्हे तर कुठल्याही भाषेतील साहित्य व साहित्यिकांची ऐतिहासिक परंपरा जर पाहीली तसेच अनेक संस्थांमार्फत बहुजन साहित्य संमेलनासारखी छोटी – मोठी मराठी साहित्य संमेलने वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी पार पडत असल्याचे आताशा आपण नेहमीच पाहत असताना अशा संमेलनातील साहित्यिकांना ऐकून इतर विविध व्यवसाय करणारे अनेक लोक साहित्यिक झाले आहेत हेही आपण सर्व जाणून आहोत. त्या सर्वांचे अवलोकन करताना एवढे निश्चित म्हणता येईल की प्रतिभेला शिक्षणाच्या कुबड्यांची आवश्यकता नसते ! असे प्रतिपादन दि. ३१ – ०३ – २०२५ रोजी महाराष्ट्रंच नाही तर महाराष्ट्राबाहेरही विविध राज्यात ख्यातनाम बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतील राजे लखुजी जाधव साहित्य नगरी, मातोश्री मंगल कार्यालय येथे धूमधडाक्यात संपन्न झालेल्या बहुजन साहित्य संमेलनामधे संमेलनाध्यक्ष प्राचार्य एन्. बी .चापे यांनी आपल्या भाषणातून केले.
सहावे बहुजन साहित्य संमेलन सिंदखेडराजा तेथे ३१ मार्च ला मोठ्या उत्साहात पार पडले, त्यावेळी ते अध्यक्ष पदावरुन बोलत होते. तत्पुर्वी सकाळी ९ वाजता राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळावर त्यांच्या पुतळ्याला विविध प्रांत तथा जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित झालेल्या साहित्यिक कवी आणि लेखक व रसिक माता भगिनींना सर्व मान्यवर मंडळींनी पुष्प हार अर्पण करून तथा छत्रपती शिवबांना मुजरा करणाऱ्या गीताच्या गजरात, महाराष्ट्र राज्याच्या संस्थापने दरम्यानच्या काळात पुरोगामीत्व तथा प्रगतीशीलतेचा व राष्ट्रीयतेचा नवाच वारसा निर्माण करणारे तत्कालीन फुले – आंबेडकरी विचारांचे, देशातील पहिले आदर्श गाव म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मौजे सावरगाव डुकरे, ता. चिखली, जि. बुलढाणा येथील पुरोगामी विचारांचा वारसा बोधप्रद भजनी मंडळाच्या द्वारे जपणाऱ्या शाहीर विजय डुकरे पाटील त्यांच्या बरोबरीने हे प्रबोधन कार्य आपल्या मधूर आवाजामधून पुढे चालविणारी त्यांची अर्धांगिनी सौ. अलका विजय डुकरे पाटील या मां जिजाऊंच्या लेकीने सुशोभित पाटावर संविधान ग्रंथ आपल्या डोक्यावर घेऊन गायन करीत संविधान दिंडीला सुरूवात करण्यात आली. यावेळी बहुजन साहित्य संघाचे हरहुन्नरी कलावंत अध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या ” दिंडी निघाली – दिंडी निघाली sss संविधान ग्रंथाची दिंडी निघाली ” या गिताने परीसर दुमदुमुन गेला होता. या दिंडीमध्ये झेप साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डी. एन्. जाधव आणि विधिज्ञ डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या तसेच डॉ. कस्तुरे व त्यांच्या वकील व कवयित्री पत्नी रेखाताई हणमंते यांच्या आणि स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲम्बेसेडर डॉ. संघर्ष सावळे यांच्या व डॉ. कस्तुरे अशा विविध जोड्यांनी गीताच्या तालावर खेळलेल्या फुगडीने वेगळीच रंगत आणली.
राजे लखुजी जाधव साहित्य नगरीत पोहचल्या नंतर डॉ . कस्तुरे यांनी काढलेल्या चित्रप्रदर्शनीचे उदघाटन कवयित्री राजकन्या पायके यांनी केले तर रांगोळी प्रदर्शनीचे उदघाटन विधिज्ञ रेखाताई हणमंते यांच्या हस्ते महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या नंतर राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फूले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन सिंदखेडराजा नगरीचे उपविभागीय अधिकारी तथा महाराष्ट्राच्या तळागाळातील व विकासाच्या वाटा पासून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच विशेषतः भटक्या पारधी समाजातील आबालवृद्धांना संवैधानिक सर्वांगीण विकासाच्या गंगेत सामील करून घेण्याचा वसा बालपणापासून उचलणारे मा. संजय खडसे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. चापे म्हणाले की, साहित्य हा समाजाचा आरसा असतो व साहित्यिक हा लोकशिक्षक असतो. आपल्या मराठी भाषेतील साहित्य इतर भाषेतही अनुवादित व प्रकाशित झाले आहे. बहुजन साहित्य संमेलनाचे संयोजक विधिज्ञ डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या कार्याचे भाषणातून त्यांनी कौतुक केले. सुरवातीला बहुजन साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने यांनी संमेलनाची भूमिका विषद केली. मावळते संमेलनाध्यक्ष व सुप्रसिद्ध समीक्षक मा. किरण डोंगरदिवे, झेप संपादक डी. एन्. जाधव, उपविभागीय अधिकारी मां. संजय खडसे यांची समयोचित भाषणे झाली.
उदघाटन सत्रात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वयोवृध्द भीम शाहीर आयुष्मान पांडूरंग अवसरमोल तथा या चळवळीत त्यांना चिरंतन साथ देणारी त्यांची पत्नी सौ. जनाबाई अवसरमोल, मा. शिवा माळोदे, मा. सुशीलकुमार खरात, त्यांचे बालपणापासूनच प्रबोधनाचा वसा उचलणारे अल्पवयीन चिरंजीव वंश खरात, लहानपणीच फुले- आंबेडकरी विचारांचा आपल्या गायक वादक वडीलांचा वारसा चालविणाऱ्या बाल कलावंत जय दत्तात्रय राऊत, शाहीर विजय डुकरे पाटील व त्यांची पत्नी सौ. अलका विजय डुकरे पाटील, अडाणी असतांनाही लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीत गायनाचा व प्रबोधनाचा वसा पुढे चालविणारे तथा डोळ्याने अधू असणारे शाहीर भाऊराव साळवे, चिखली, अगदी अडीच ते तीन वर्षांचाच असताना मराठी व हिंदी चित्रपटात आपल्या आई डॉ. रेणू जोशी प्रमाणेच अभिनय कौशल्य दाखवणारा बाल कलाकार अभिनय श्रीपाद जोशी, साहित्यिक चळवळ चालवणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री मा. कल्पना निंबोकार, सामाजिक कार्यास वाहून घेतलेले मा. हृदयनाथ हिवराळे, छत्रपती संभाजीनगर, बालपणापासून काव्यासक्ती असणाऱ्या तथा अल्पवयातच प्रकाशन संस्था चालवणाऱ्या मा. रविना पवार पाटील, धुळे, सामाजिक तथा साहित्यिक क्षेत्रात सर्वांच्या सुखदुःखाची दखल घेणारे मा. प्राचार्य चापे सर, फुले – आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजी वाठोरे, सिल्लोड, पुरोगामी वैचारिक वारसा जपणारे प्राचार्य ज्ञानेश्वर गोरे, देऊळगाव राजा, अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध परीसरात घडलेल्या विकलांग व मनोरुग्ण तरूणीच्या सामूहिक बलात्कार व निर्घृण खून प्रकरणास आपल्या आक्रमक व संघर्षशील महिला सुरक्षा समितीच्या माध्यमातून वाचा फोडून मृत पिडीतेस मरणोत्तर न्याय मिळवून देणाऱ्या डॉ.प्रभाताई चिंचोले, बुलढाणा तसेच त्याच प्रकरणात व त्यांच्या बरोबरीने सातत्याने महिला सुरक्षा समितीच्या चिखली च्या तत्कालीन अध्यक्षा डॉ. कुसुमताई देशमुख, महिला उद्धारक चळवळीतील खंदे व्यक्तिमत्व सौ. आशाताई घाटगे, मागणी, चिखली, खान्देशी व मराठी काव्य गायनातून प्रबोधन करणारे मा. भीमराव सोनवणे, एरंडोल, हॉटेलचा व्यवसाय करीत असतांनाही मुळचा सहृदयी काव्यपिंड जपत पुरोगामी विचारांशी कायमची नाळ असलेले मा. संजय सोनुने, फर्दापूर, छोटीमोठी प्रासंगिक नोकरी करीत मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातूनही साहित्य संमेलने भरवण्यात प्रथम क्रमांकावर असलेला तरूण मा. योगेश ताटे, औसा, दैनिक पुण्यनगरी द्वारे वास्तविक लिखाण करणारे परळी तालुका प्रतिनिधी धनंजय आरबुने, वकीली व्यवसाय सांभाळीत साहित्यिक संमेलन अखंड चालवणारे मा. ॲड. शंकर कदम, परभणी, वाडवडीलांपासून पारंपारिक चालत आलेली सांस्कृतिक नाळ जोपासत वैचारिक वाटचाल करणारे स्मशानजोगी मा. गणेश रामा शेनुरे, चिखली, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील व्यवसायी पण मनापासून औदार्य जपत गोरगरीबांच्या सामाजिक, कौटुंबिक कार्यास सदा तत्पर असणारे आणि मातृतीर्थातील या पहिल्या ऐतिहासिक अविस्मरणीय बहुजन साहित्य संमेलन सोहळ्यासाठी आपले सुंदर, सुशोभित व नयनरम्य सृष्टिसौंदर्याने नटलेले मातोश्री मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देणारे मा.शिवप्रसाद उर्फ शिवाभाऊ ठाकरे, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतांनाही पारंपारिक तबलापेटी दुरूस्ती सह विविध जातीधर्माच्या गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या एकता नगरच्या सर्वधर्मीय समभाव चळवळीस वाहून घेतलेले मा. विश्वनाथ बावस्कर, चिखली, तीन दशकांपासून साहित्यिक व सामाजिक प्रबोधन करणारे मा. माणिकराव गोडसे, नाशिक , कंडक्टर म्हणून नोकरी करताना अलीकडेच बसचे ब्रेक्स फेल झाल्याचे चालकाने सांगताच गच्च भरलेल्या बसमधील सर्व प्रवाशांना आपल्या जीवाची पर्वा न करता बसच्या मागील भागात नेवून, बसच्या झालेल्या अपघातामधून साऱ्यांचे जीव स्वतः जखमी होऊन सुद्धा वाचविणाऱ्या झुंजार ज्येष्ठ कवयित्री मा. यशोदा पांढरे, जळगाव, सर्वांचे सामाजिक भान व जाण जपणारे सूर्यभान शिंदे, मलकापूर, पोलिस विभागाची कर्तव्यकठोर नोकरी करतांनाही समाजाचे देणे लागतो या भावनेने कार्य करणारे मा. एकनाथराव पाडळे, छत्रपती संभाजीनगर, प्रवचन व भजन कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या मा. कवयित्री मा. शीला शिवरकर, कारंजा लाड, सामाजिक व शैक्षणिक कार्यास वाहीलेले मा. राहूल पवार, चिखली इ. मान्यवरांना फुले – शाहू – आंबेडकर या राज्यस्तरीय पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
तसेच या संमेलनाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनात उपस्थित साहित्यिक व मान्यवर महिलांना मां जिजाऊंच्या माहेर नगरी मधून येवला नवूवारी पैठणींची सप्रेम भेट देवून संमेलनाच्या विशेष अतिथी सिने अभिनेत्री डॉ. रेणू जोशी, पि. इ. एस्. ( औरंगाबाद ) छत्रपती संभाजीनगर चे माजी प्राचार्य डॉ. हिंमतराव जाधव, ॲड. रेखाताई हणमंते, डॉ. संघर्ष सावळे, प्राचार्य चापे सर, दाभाडे साहेब, डॉ. नंदीनी रिंढे, डॉ. सावली राऊत, प्रा. भास्कर इंगळे, मा. किरण डोंगरदिवे सर, मा. डी. एन्. जाधव, मा. कडूबा बनसोड, डॉ. बबनराव महामुने, डॉ. खरात, प्रा. काटोले इ. मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सर्वांना सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात चिखली येथील पंचशील भजनी मंडळाच्या कलावंत, गायक, वादक सदाशिव फुलझाडे, दत्ता राऊत, साहेबराव बोर्डे, सुशीलकुमार खरात व त्यांचे चिरंजीव वंश खरात, विजय डुकरे पाटील व डॉ. कस्तुरे इ. च्या बेटी बचाव, बेटी पढाव संदर्भातील मराठी व इंग्रजी गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन मां. डॉ . सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी मा. सुधीर शेरे सर, डोंबीवली यांच्या ओव्या दिनांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या संमेलनाच्या संपन्नतेमधे पूर्वनियोजित अध्यक्ष सुप्रसिद्ध गझलकार डॉ. गणेश गायकवाड, बुलढाणा यांचा सिंहाचा वाटा असून मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचे उदारहृदयी व कार्यकर्तुत्ववान आमदार मां. मनोज कायंदे यांच्या व त्यांच्या सहकार्यशील मित्रमंडळी व कार्यकर्त्यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याने उपस्थित सर्व मान्यवर रसिक प्रेक्षकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आभार मानले. बहुजन साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ब. सा. सं. चे उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, सचिव डॉ. डी. व्ही. खरात, तथा प्रा. शालीनी काटोले, ॲड. रेखाताई हणमंते, भाव कवी अंकुश पडघान, दैनिक लोकनेता चे तरूण संपादक ज्ञानेश्वर बुधवत, संजय सोनकांबळे, विशाल जायभाये, वरद जायभाये, ज्येष्ठ कवी व सामाजिक कार्यकर्ते गजानन दराडे, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे विशेष उपाध्यक्ष मा. रविंद्र सोनार, फोटोग्राफर विठ्ठल सपकाळ, कवयित्री ॲड. वर्षा कंकाळ, केंद्रीय मानवाधिकार चे संदीप शिंदे, पवन शर्मा तथा मनोज शर्मा बंधू, ॲड. देवराव वानखेडे, चिखली तथा सर्व मित्रमंडळी व बऱ्याच ऊदारहृदयी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.
देखण्या बहुजन साहित्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन संयोजक विधिज्ञ डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन. डॉ. खरात यांनी केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जळगांव, पुणे , लातूर, अमरावती, नागपूर, धुळे, नाशिक, नगर, ठाणे, मुंबई या सह अनेक जिल्ह्यातील साहित्यिक, समीक्षक विचारवंत आणि रसिकांनी मोठ्या संख्येने साहित्य संमेलनात हजेरी लावली हे विशेष ! त्यामुळे हे संमेलन खऱ्या अर्थाने ” बहुजन” साहित्य संमेलन ठरले असे म्हणावे लागेल.

