टोल पद्धतीत होणार बदल

🔷 काही दिवसांत होणार बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-उच्च आणि दर्जेदार रस्ते हवे असतील तर त्यासाठी टोल ही लागणारच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली टोल प्रणाली येत्या काही दिवसात बदलण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार देशातील संपूर्ण टोल प्रणाली बदलणार आहे.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, नवीन प्रणाली सामान्य नागरिकांना मोठा दिलासा देईल. सध्या अस्तित्वात असलेले टोलचे दर देखील कमी होतील. त्याची घोषणा ८ ते १० दिवसांत होईल. गडकरी म्हणाले देशात रस्त्यांच्या विकासासाठी टोल गरजेचा आहे. त्याचप्रमाणे ही प्रणाली यूजर-फ्रेंडली होणे देखील तितकीच गरजेची आहे.