सद्भावनेची मशाल तेवत राहिली पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ

कॉँग्रेस सद्भावना सत्याग्रह

बीड परळी -वैजनाथ दि.३ – दिवसेंदिवस बिघडत चाललेला सामाजिक व जातीय सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने मागच्या काही दिवसांपासून सद्भावना अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आणि त्याच अनुषंगाने परळी मध्ये सुमारे चार तास सद्भावना सत्याग्रह करून सद्भावना वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेतून वाढत चाललेल्या सामाजिक व जातीय प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्रात सद्भावना वाढणे गरजेचे असल्याची संकल्पना मांडली. आणि त्यानुसार सद्भावना अभियानांतर्गत मागच्या कांही दिवसांपूर्वी मस्साजोग ते बीड पायी रॅली काढण्यात आली होती, आणि प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला होता.

दुसऱ्या टप्प्यात परळी वैजनाथ येथे सद्भावना सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे नियोजन खा.रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, युवानेते आदित्य पाटील,उपाध्यक्ष ऍड. प्रकाश मुंडे, शहराध्यक्ष बहादूर भाई तसेच काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. शनिवार दिनांक ३ मे रोजी परळी शहरातील मोंढा मैदान येथे सदरील सदभावना सत्याग्रहाचे आयोजन सकाळी दहा वाजता करण्यात एके होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन करून वंदे मातरम ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आणि यावेळी पहलगाम येथे निष्पापणे बळी गेलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. यानंतर सुमारे चार तास अतिशय शांततेमध्ये सत्याग्रह सुरू करण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. समारोपप्रसंगी कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले विचार मांडले. त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जो काही सामाजिक आणि जातीय सलोखा बिघडलेला आहे.

त्यावर एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये सद्भावना वाढली पाहिजे सद्भावनेच्या दुधामध्ये जणूकाही बीडने मिठाचा खडा टाकावा अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक नागरिकाला शांतता हवी आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय विदारक चित्र निर्माण झाले असून यावर कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सद्भावना वाढीसाठी सद्भावना अभियान सुरू केलेले आहे. सद्भावना सत्याग्रहामध्ये जे नागरिक सहभागी झाले ते अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. आणि सत्याग्रहाचे आयोजनही बीड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच परळी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय उत्कृष्ट केले असेही ते म्हणाले. आपल्या विस्तृत भाषणामध्ये अनेक मुद्द्यांना स्पर्श करत हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित नागरिकांना मौलिक विचार दिले. आणि प्रत्येकानी सद्भावना वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही मत व्यक्त केले. काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, बीड जिल्हा प्रभारी अमर खानापुरे, युवानेते आदित्य पाटील, नवनाथ थोटे, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, प्रविकुमार शेप, पशुपतीनाथ दांगट, बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत तसेच तुकडोजी महाराजांच्या संगीतमय विचाराने करण्यात आली.