दू:खद निधन
परळी/ प्रतिनिधी – जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अमीर (अध्यक्ष) मौलाना इलियास खान फलाही यांनी मौलाना वस्तानवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले की, “मौलाना वस्तानवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणाला दूर करण्यासाठी समर्पित केले.” जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मौलाना गुलाम वस्तानवी यांच्या निधनाला मुस्लिम समाजासाठी एक मोठी हानी म्हणून संबोधले. ते म्हणाले की ही अशी हानी आहे, ज्याची भरपाई सध्याच्या घडीला करणे अत्यंत कठीण आहे.
मौलाना फलाही म्हणाले की, गुलाम वस्तानवीसारखे व्यक्तिमत्त्व समाजात फारच कमी राहिले आहे. जरी त्यांच्या सारखा पर्याय मिळणे अशक्य नसले तरी, ते निश्चितच खूप कठीण आहे. मौलाना वस्तानवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणावर उपाय शोधण्यात घालवले. मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, “जेव्हापासून मी समजूतदार झालो आहे, तेव्हापासून मी इतकी प्रेरणादायी व्यक्ती पाहिलेली नाही.”
ते पुढे म्हणाले की, अक्कलकोव्यात मौलाना वस्तानवी यांनी स्थापन केलेली मदरसा ही सरकारकडून नोंदणीकृत व मान्यताप्राप्त आहे. तिथे १५,००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवंगत मौलानांनी बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे शिक्षणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या प्रयत्नांचा विस्तार केवळ पारंपरिक शिक्षणापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी ITI, D.Ed, B.Ed, युनानी औषधशास्त्र, अभियांत्रिकी, कायदा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचीही व्यवस्था केली होती. या सर्व व्यवस्थांमधून त्यांच्या अपार मेहनतीबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी असलेली त्यांची तीव्र भावना दिसून येते. दिवंगत मौलाना हे एक कृतीशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कृतीद्वारे समाजाला दाखवून दिलं की फक्त चिंता करून काही होत नाही—त्या अंतःप्रेरणेला कृतीत उतरवणे आवश्यक आहे.
आपला संदेशात त्यांनी प्रार्थना केली: “अल्लाह तआला मौलानांचे दर्जे उच्च करो, त्यांच्या कुटुंबाला संयम देवो आणि समाजाला असा कोणी तरी प्रदान करो जो त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरू शकेल.”

