एलटीटी ते नांदेड विशेष रेल्वेगाडी – दर आठवड्याला धावतेय उशिराने

🔷 परभणी, परळी, लातूरच्या प्रवाशांना मनस्ताप, उन्हाळ्याच्या सुटीतच गैरसोय.
🔷 लूज टाईम कमी केल्यास प्रतिसाद मिळतो

हुजूर साहेब नांदेड- ९ एप्रिलपासून सुरू झालेली लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हुजूरसाहिब नांदेड ही उन्हाळी विशेष रेल्वे प्रारंभा पासूनच दोन्ही दिशेला उशिरा धावत असल्याने या मार्गावरील प्रवाशी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ३० एप्रिलच्या फेरीत ही गाडी ५ तास उशिराने पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रत्येक फेरीला उशीर होत असल्याने गाडीतील प्रवाशांची संख्या घटत आहे.

ही आठवड्यातून एकदाच धावणाऱ्या या विशेष रेल्वेचे भाडे अधिक असूनही ती वेळेत पोहोचत नाही. विशेष रेल्वे एलटीटी मुंबईहून नांदेडसाठी १९ तासांचा प्रवास करते. याउलट नांदेड-पनवेल दैनंदिन रेल्वे केवळ १३ तासांत पोहोचते.
त्यामुळे प्रवासी या रेल्वेकडे पाठ फिरवत आहेत. नांदेडवरून पुण्यासाठी दररोज ५० ते १०० खासगी बसेस धावत आहेत. तरीही रेल्वे प्रशासनाने ही विशेष रेल्वे लूजटाइम कमी न करता सुरू ठेवली आहे. ही रेल्वे नांदेडवरून दर बुधवारी रात्री १०.३० वाजता निघते. परभणी, परळी, लातूरमार्गे पुण्यात सकाळी ११ वाजता पोहोचते, तर मुंबई एलटीटी येथे दुपारी २.४५ वाजता पोहोचते. मुंबईहून ही रेल्वे बुधवारी रात्री १२.३० वाजता निघते. पुण्यामार्गे दिवसभर प्रवास करून नांदेडला रात्री ९ वाजता पोहोचते. संघटनांनी लूजटाइमवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील वेळ ४५ मिनिटांनी कमी केला. त्यामुळे ही रेल्वे आता रात्री ९ ऐवजी ८.१५ वाजता पोहोचते