क्षुल्लक  कारणावरून आंबोली येथे पर्यटकास मारहाण; चौघे ताब्यात 

🔶 पर्यटन- पर्यटक 

सिंधुदुर्ग -सावंतवाडी :– सध्या उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमानवर येत आहेत. मात्र काही वेळा स्थानिक व्यवसाईक आणि पर्यटक यांच्यात बाचाबाची,किंवा ईतर किरकोळ तक्रारी होत असतात. मात्र  आंबोली येथे चहाच्या टपरीवर सुट्ट्या पैशांवरून तेलंगणातील पर्यटकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना मंगळवारी अटक केली. या चार संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही संशयितांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.

फिर्यादी राकेश छोक्कय्या गुंडा (२८, रा. तेलंगणा) हे सोमवारी सायंकाळी नातेवाईकांसोबत आंबोली धबधब्याजवळ चहा  नाश्ता करण्यासाठी थांबले होते.दरम्यान बिला पोटी टपरी चालकाने त्यांच्याकडे सुट्ट्या पैशांची मागणी केली. मात्र आपल्याकडे सुट्टे पैसे नसल्याचे राकेश यांनी सांगितल्यावर टपरी चालक व त्यांच्यात वाद झाला होता . या वेळी आपणास  संबंधितांनी  मारहाण केल्याची तक्रार पर्यटक राकेश गुंडा यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून सावंतवाडी पोलिस ठाण्यात संशयित विजय बाबुराव गावडे (४०), सचिन पुंडलिक गावडे (४५), प्रभाकर बाळकृष्ण परब (५३) आणि नागेश महादेव हंगीरकर (२५, सर्व रा. चौकुळ, ता. सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी त्यांना अटक करुन सावंतवाडी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या संशयितांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.