पहलगाम भ्याड हल्ल्याचा बदला, देशभरात जल्लोष

🔺ऑपरेशन  सिंदूर  🔺दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला 

पुणे-संभाजीनगर  :  जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी निष्पाप पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ पुरूषांना मारले. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर संबंध देशात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याला तीव्र आणि योग्य उत्तर दिले जाईल सांगितले होते. या घटनेच्या अवघ्या १५ दिवसातच भारतीय लष्कराने पाकव्याप्त पंजाब, काश्मीर येथील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर ७ मे रोजी मध्यरात्री हल्ला केला आणि पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. याचा देशवाशियानाआनंद  झाला आहे.

भारतीय सैन्याचे मानावे तेवढे आभार कमी असल्याचे मत, भावना अनेक पक्ष, संघटना, विचारवंत यांनी व्यक्त केले. भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री २५ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना मारले. आपल्या सैन्यादलाचा संबंध देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी भारतीय लष्कराने करुन दाखवल्याणे राज्यातील अनेक प्रमुख शर्यत जल्लोष साजरा करण्यात आला .

‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारतीय वायू सेनेने मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिट म्हणजेच अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानला जेरीस आणले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेला बदला हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आहे, अशी भावना देखील देशभरात  व्यक्त केली जात आहे.