सीमेवरील नागरिक जम्मूत हलवले

🔶 ऑपरेशन सिंदूर
श्रीनगर: वृत्तसंस्था – पाकिस्तानने सीमेवर अंदाधुंदपणे तोफगोळ्यांचा मारा सुरू केला आहे. तेथे अनेक घरांचे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. १६ निष्पाप नागरिकांचा त्यात बळी गेला आहे. त्यामुळे सीमेवरील गावांतून त्यांना जम्मू भागात स्थलांतरित करण्यात आले आहे.

त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिकांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांप्रती हे नागरिक कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहेत.
प्रक्षोभक कारवाया सुरू ठेवल्यास सडेतोड प्रत्युत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्डे अत्यंत अकल्पनीय अचूकतेने नष्ट केले. जर प्रक्षोभक कारवाया सुरूच ठेवल्या तर देश कालच्यासारखेच सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना, राजनाथ यांनी ऑपरेशन राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले राबवताना सशस्त्र दलांच्या धैर्य आणि शौर्याचे कौतुक केले आणि सांगितले की, या मोहिमेत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

मी सशस्त्र दलांना त्यांची कार्यवाही आणि त्यांनी दाखवलेल्या धैर्य आणि शौर्याबद्दल अभिनंदन करतो. पाकिस्तान आणि पाकव्याप्त
काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले, हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे, असे सिंह म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अत्यंत अचूकतेने राबवले गेले आहे, हे अत्यंत प्रशंसा करण्यासारखे आहे. नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात
आले आणि अनेक दहशतवादी ठार झाले. ऑपरेशनदरम्यान कोणताही सामान्य नागरिक जखमी झाला नाही. ऑपरेशन सिंदूर’ हे सशस्त्र दलांच्या उच्च दर्जाच्या उपकरणांमुळे शक्य झाले, भारताच्या संयमाची कृपया कमजोरी समजू नये. आपल्याला संवादाद्वारे समस्यांचे समाधान करायचे आहे; पण याचा अर्थ असा नाही की, कोणताही व्यक्ती आपला संयमाचा फायदा घेऊ शकतो… जर कोणी आपला संयमाचा चुकीचा फायदा घेतला, तर त्यांना कालच्याप्रमाणे उच्च दर्जाच्या प्रत्युत्तरसाठी तयार राहावे लागेल.